विशाळगड अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदू समाजाची दिशाभूल करू नये - कुंदन पाटील, सकल हिंदू समाज

 विशाळगड अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदू समाजाची दिशाभूल करू नये  - कुंदन पाटील, सकल हिंदू समाज 




कोल्हापूर १० प्रमोद पाटील 

 छत्रपती संभाजीराजे हे ६ वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते तेव्हा त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी कधीही आवाज उठवला नाही. ते रागयड प्राधिकारणाचे अध्यक्ष होते तेव्हाही या अतिक्रमणाविषयी त्यांनी कधी आवाज उठवला नाही. ७ जुलैला जेव्हा सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाळगड येथे महाआरती करण्यात आली तेव्हा छत्रपती संभाजीराजे हे सहभागी झाले नाहीत. १४ जुलैला आता ते स्वतंत्र आंदोलन का करत आहेत ? हा प्रश्‍न सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असतांना विशाळगड अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदू समाजाची दिशाभूल करू नये, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केले. ते सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू एकता कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदू महासेभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, सर्वश्री प्रमोद सावंत, अभिजित पाटील, राजू तोरस्कर, योगेश केरकर, सोहम कुराडे, सनी पेणकर, आनंद कवडे, विकी भोगम, केदार मुनीश्‍वर, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर उपस्थित होते. 

श्री. कुंदन पाटील पुढे म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी विशाळगडाच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनानंतर प्रथम १३ सप्टेंबर २०१९ ला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत पुरातत्व विभागासह सर्व अधिकार्‍यांची बैठक होऊन येथील अतिक्रमण काढण्याविषयी चर्चा झाली. यानंतर वर्ष २०२२ मध्ये वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवर यांच्या समवेत मी आणि श्री. विक्रम पावसकर यांची संह्याद्री अतिथीगृहावर विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संभाजीराजे यांनी होऊ दिली नाही आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली. यानंतर गेली २ वर्षे संभाजीराजे यांनी काय केले ? 

७ जुलैला विशाळगडावर सकल हिंदू समाजाची महाआरती झालेली असतांना परत एकदा १४ जुलैला हिंदू समाजाला विशाळगडावर बोलावून संभाजीराजे हिंदू समाजात दुफळी माजवत आहेत का ? या संदर्भात प्रत्यक्षात जर काही करायचे असेल, तर संभाजीराजे याविषयी उच्च न्यायालयात चांगला अधिवक्ता का देत नाहीत ? जेव्हा संभाजीराजेंकडे अधिकार होते तेव्हा काहीच करायचे नाही आणि आता विशाळगडावर जाण्यासाठी आवाहन करायचे, हा नेमका काय प्रकार आहे ? यातून गडावर कोणता अनुचित प्रकार घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? त्यामुळे हिंदू समाजानेही कोणत्याही प्रकारे आततायीपणे कृती न करता शांतपणे या लढ्यात सकल हिंदू समाजाच्यासमवेत उभे रहावे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.