विमा असणे हे काळाची गरज त्यासाठी बजाज आलियांज तत्पर : तपन सिंघल एम डी बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स
कोल्हापूर १८ प्रमोद पाटील
विमा असणे हे काळाची गरज त्यासाठी बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स नेहमीच आघाडीवर असेल असं प्रतिपादन बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स चे एम डी तपन सिंघल यांनी आज पत्रकार परिषदेत केले .
बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स चे एम डी तपन सिंघल आज कोल्हापुरात नव्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद केला. पुढे बोलताना विमा असणे किती गरजेचे आहे याचे महत्व त्यांनी पटवून दिले. विमा क्षेत्र कसं देशाच्या अर्थव्यवस्थेला पूरक आहे त्यामुळे विमा असणे ही काळजी गरज आहे.
गेल्या ३० वर्षात बजाज आलियांज जनरल इन्शुरन्सवर १४ करोड ग्राहकांनी विश्वास दर्शविला आहे. अश्याप्रकारे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी सेवा देण्यासाठी बजाज आलियांज जनरल नेहमीच आघाडीवर असेल असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर शहराचे कौतुक करताना त्यांनी सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे नवीन शाखा भविष्यात सुरू होतील अशीही माहिती दिली
यावेळी बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स संपूर्ण टीम उपस्थित होती.