कोल्हापूर लोकसभा निवडणूक २०१९

भाजपा युवक तसेच भटके विमुक्त जमाती मेळावे उत्साहात संपन्न

कोल्हापूर दि.१० भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याच्या वतीने उभा मारुती चौक शिवाजी पेठ येथे युवकांचा मेळावा तसेच भाजपा भटके विमुक्त जाती आघाडीच्यावतीने गजगेश्वर चौक, जोशी गल्ली येथे मेळावा संपन्न झाला.

     उभा मारुती चौक येथील युवकांच्या मेळाव्यात बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई म्हणाले, स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासोमर ठेवून देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांची आयुष्यभर वाटचाल सुरु आहे. स्वामी विवेकानंद यांनी म्हंटल्या प्रमाणे देशाच्या सर्वोन्नतीसाठी युवकांच्या हातातच देशाचे भविष्य आहे. म्हणूनच डिजिटल इंडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी युवकांना देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जात-धर्म पंथ न मानता या भारत देशाला ओजस्वी बनवण्यासाठी सर्व युवकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या देशाला सामर्थवान बनवण्यामध्ये पुढाकार घ्यावा.

     भटके विमुक्त जातीच्या मेळाव्यात गजगेश्वर चौक येथे बोलतना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव म्हणाले, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून अगदी २०१४ पर्यंत कॉंग्रेस राजवटीने प्रत्येक माणसाला त्याच्या जाती-जातीमध्ये भांडणे लावून स्वत:चे घर भरण्याचा व्यवसाय थाटला होता. परंतु ज्या मातृसंस्थेतून आपल्या सामाजिक कामाची सुरवात करणाऱ्या पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी जात-पंथ विरहीत समाज निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले. भारत देशामध्ये वर्षानुवर्षे सर्व जाती धर्माचे लोक सुखाने नांदत असताना फक्त मताच्या राजकारणासाठी कॉंग्रेसने काही विशिष्ठ जाती धर्माच्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले. इतकेच नव्हे तर या समाजाला शिक्षणापासून, आरोग्यापासून, नोकरी व व्यवसाया पर्यंत कधीच स्वत:चा पायावर उभे राहू दिले नाही. परंतु पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने विविध जनकल्याणकारी निर्णय घेऊन अनेक वर्षापासूनचा बॅकलॉग भरून काढण्याचा पुरेपूर प्रत्यन केला. स्टार्टअप इंडिया, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना इत्यादीच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

   

     आगामी ५ वर्षामध्ये पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सरकारमध्ये अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून या देशाला जगातील पहिल्या तीन क्रमांकाच्या देशाच्या पंगतीमध्ये बसवण्यासाठी व संसदेमध्ये मा.नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदार प्रा.संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, संतोष भिवटे, राहुल चिकोडे, सुजित चव्हाण, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, दिग्विजय कालेकर, गिरीष साळोखे, भरत काळे, नगरसेवक अजित ठाणेकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.

वरील सभांचे सूत्र संचालन सुरेश जरग यांनी केले.

     याप्रसंगी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, शिवाजीराव जाधव, अजित मोरे, सायनेकर सर, शंकर मोरे, के.एम.चौगले, सुरेश गजगेश्वर, अर्जुन पाटील, मधुकर वासुदेव, अशोक वासुदेव, बजरंग माने, विश्वनाथ चौगले, साजन माने, सुशांत पाटील, अमर मोरे अॅड.संपतराव पवार, मारुती भागोजी, हितेंद्र पटेल, अक्षय मोरे, विवेक वोरा, सुमित पारखे, विश्वजित पोवार, सजय मेंगाणे, प्रसाद शिंदे, शाहरूख गडवाले, प्रसाद मोहिते, पुष्कर श्रीखंडे, श्रीधर हांडे, नजीर देसाई, संजय सांवत, रविंद घाटगे, सचिन जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.