नीता अंबानीं यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त 'अन्न -सेवा'
देशभरात 1.4 लाख व्यक्तींना अन्नदान
नीता अंबानी यांनी 3 हजार मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.
मुंबई २ प्रतिनिधी
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी 1 नोव्हेंबर रोजी त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यावेळी अन्न सेवेअंतर्गत 15 राज्यांतील 1.4 लाख लोकांना अन्नदान करण्यात आले. अन्न सेवेच्या माध्यमातून सुमारे 75 हजार लोकांना शिजवलेले जेवण देण्यात आले तर सुमारे 65 हजार रुपयांच्या कच्च्या रेशनचे वाटप करण्यात आले.
लहान मुले, वृद्धाश्रमातील वयोवृद्ध, रोजंदारीवर काम करणारे, ट्रान्सजेंडर समुदायातील लोक, कुष्ठरोगी आणि विशेष गरजा असलेल्या लोकांना जेवण देण्यात आले. अन्न वाटपापासून ते विविध ठिकाणी गरमागरम जेवण देण्यापर्यंतची सर्व कामे रिलायन्सच्या स्वयंसेवकांनी केली. नीता अंबानी यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 3000 मुलांमध्ये वाढदिवस साजरा केला.
कोरोना महामारीच्या काळात नीता अंबानींच्या रिलायन्स फाऊंडेशनने अन्न सेवा नावाने त्यावेळचा सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवला होता. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न वाटप हा त्याच परंपरेचा विस्तार आहे.
नीता अंबानी यांनी शिक्षण, महिला सबलीकरण, क्रीडा, कला आणि संस्कृती या क्षेत्रांत अगणित कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने देशभरातील 7 कोटी 10 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनावर परोपकार केला आहे.